२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
स्वाध्याय
प्र.[१]. ( अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा .
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
( १ ) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक…………. हे होत .
( अ ) अलेक्झांडर कनिंगहॅम
( ब ) विल्यम जोन्स
( क ) जॉन मार्शल
( ड ) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
उत्तर: भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होत .
( २ ) हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ……..यांनी केला .
( अ ) जेम्स मिल
( ब ) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
( क ) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
( ड ) जॉन मार्शल
उत्तर: हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद फ्रेडरिक मॅक्सम्युलर यांनी केला .
( ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा .
( १ ) हू वेअर द शूद्राज – वंचितांचा इतिहास
( २) स्त्रीपुरुष तुलना – स्त्रीवादी लेखन
( ३) द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – मार्क्सवादी इतिहासव
( ४) ग्रँड डफ – वसाहतवादी इतिहास
उत्तर:
चुकीची जोडी : द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857 – मार्क्सवादी इतिहासव
प्र.[ २ ]. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा .
( १ ) प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली .
उत्तर: ( १ ) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले .
( २ ) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला .
( ३ ) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले .
( ४ ) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच . त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली .
( २) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे .
उत्तर :
( १ ) ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ , ताम्र – शिलालेख , कागदपत्रे , नाणी , प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक ब्रिटिबखरींचाही समावेश होतो .
( २ ) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते . ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात .
( ३ ) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात .
( ४ ) तत्कालीन सामाजिक , धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते . ही वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात ; म्हणून ‘ बखर ‘ हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे .
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
प्र.[ ३ ]. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा .
( १ ) मार्क्सवादी इतिहासलेखन म्हणजे काय ?
उत्तर: स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहासलेखनात जे नवे वैचारिक प्रवाहात आढळून येतात ; त्यात ‘ मार्क्सवादी इतिहासलेखन ‘ हा एक प्रमुख प्रवाह आहे .
( १ ) मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे . मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहासलेखन केले गेले त्याला ‘ मार्क्सवादी इतिहासलेखन ‘ असे म्हणतात .
( २ ) मार्क्सवादी इतिहासलेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने , पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे .
( ३ ) प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होती , याचे विश्लेषण करणे , हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे मुख्य सूत्र आहे .
( ४ ) मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला . भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी , डांगे , शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहासलेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो .
( २ ) इतिहासाचार्य वि . का . राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा .
उत्तर: भाषाशास्त्र , व्युत्पत्तिशास्त्र आणि इतिहासलेखन यांत मूलभूत संशोधन करणाऱ्या वि . का . राजवाडे यांचे इतिहासलेखनातील योगदान पुढीलप्रमाणे-
( १ ) राजवाडे यांनी ‘ मराठ्यांच्या इतिहासाची साधने ’ असे शीर्षक असणारे २२ खंड संपादित केले .
( २ ) इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय , हा विचार मांडला .
( ३ ) केवळ राजकीय घडामोडी , सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती म्हणजे इतिहास नव्हे , असे त्यांचे मत होते.
( ४ ) आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे , हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला.
( ५ ) अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे , याबाबत तो आग्रही होते .
( ६ ) स्थळ , काळ व व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहासलेखन असायला हवे असे त्यांचे मत होते . इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते इतिहासाला दिलेले मोठे योगदान आहे .
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
प्र.[ ४ ]. पुढील तक्ता पूर्ण करा.
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | |
द हिस्टरी ऑफ इंडिया | |
श्री.अ.डांगे | |
हू वेअर द शूद्राज |
उत्तर:
जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
जेम्स ग्रँड डफ | ‘ ए हिस्टरी ऑफ द मराठाज् ‘ |
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन | द हिस्टरी ऑफ इंडिया |
श्री.अ.डांगे | प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू सलेव्हरी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर | हू वेअर द शूद्राज |
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
प्र.[ ४ ].ब) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
उत्तर:

४) झियाउद्दीन बरनी- तारीख-इ-फिरुजशाही ५) बाबर-तुझुक-इ-बाबरी.
२. इतिहासलेखन : भारतीय परंपरा
प्र. [ ५ ]. पुढील संकल्पना स्पष्ट करा .
( १ ) प्राच्यवादी इतिहासलेखन
उत्तर🙁 १ ) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते . या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ‘ प्राच्यवादी अभ्यासक ‘ असे म्हणतात .
( २ ) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती , इतिहास , येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले . या लेखनाला ‘ प्राच्यवादी इतिहासलेखन ‘ असे म्हणतात .
( ३ ) प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास करून या भाषांची जननी प्राचीन इंडो – युरोपीय भाषा होती , ‘ अशी कल्पना मांडली .
( ४ ) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले .
२ ) राष्ट्रवादी इतिहासलेखन
उत्तर🙁 १ ) एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू झाली . या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली . आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहासलेखन केले त्या लेखनास ‘ राष्ट्रवादी इतिहासलेखन ‘ असे म्हणतात . ( २ ) या राष्ट्रवादी इतिहासलेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहासलेखनाला विरोध केला .
( ३ ) भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले .
( ४ ) राष्ट्रवादी इतिहासलेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरणा मिळाली ; तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली .
( ३ ) वंचितांचा इतिहास
उत्तर🙁 १ ) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले , उपेक्षित ठेवले ; अशा समूहांच्या इतिहासाला ‘ वंचितांचा इतिहास ‘ असे म्हणतात .
( २ ) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली .
( ३ ) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली .
( ४ ) भारतात महात्मा फुले व डॉ . आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो . लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते . वंचितांच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे चित्रण केले गेले .
उपक्रम
पाठात उल्लेख केलेल्या विविध इतिहासकारांच्या कार्याची माहिती देणारे सचित्र हस्तलिखित आंतरजालाच्या साहाय्याने तयार करा .